सकारात्मक मानसिक आरोग्य


मधुमेह, रक्तदाबाचे आजार वगैरे आजार आपल्याला माहित आहेत, जे एक शारीरिक आजार आहेत. शारीरिक आजाराचा आपल्या मानसिक आरोग्याशी काही संबंध असतो का ? हो , खरतर या दोन्ही गोष्टींमध्ये अत्यंत जवळचा संबंध आहे. 

आपण माणूस म्हणजे दोन गोष्टी. एक म्हणजे शरीर आणि दुसरे म्हणजे मन. जसे एका कम्प्युटरमध्ये त्याचा हार्डवेअर असतो जे आपण  डोळ्याने बघतो ते म्हणजे जणू आपले शरीर आणि तो कम्प्युटर्स चालविण्यासाठी लागणारी ऑपरेटिंग सिस्टिम किंवा सॉफ्टवेअर म्हणजे आपले मन. आणि आपण नेहमी प्रमाणे बाहेरून दिसणाऱ्या गोष्टीनाच  जास्त महत्त्व देतो आणि ज्या गोष्टींमुळे त्या वस्तूत चालतात त्याच्याकडे दुर्लक्ष करतो तसंच काही आपल्या मानसिक आरोग्य सोबत होत असते. आपण नेहमी आपल्या बाह्य सौंदर्याकडे लक्ष देतो. त्याची काळजी घेतो. वेगळे वेगळे क्रीम्स लावतो. शरीर सूडोल दिसणायसाठी व्यायाम करतो. चांगले कपडे घालतो. जसे आपल्या कॉम्पुटर किंवा मोबाइलला आपण एखादा स्क्रीन कव्हर बसवतो, पण तो चांगला चालण्यासाठी अँटी व्हायरस टाकताना दहा वेळा विचार करतो. तसेच काही आपण आपल्या मानसिक आरोग्यासोबत करतो. आपले मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी आपण काहीही करत नाही. कधीच काळजी घेत नाही. ते बिघडल्यास ते दुरुस्त करून घेण्याची इच्छाशक्ती देखील आपल्यामध्ये नसते. मानसिक आजारासाठी लागण्याच्या औषधोपचार कडे देखील आपण  दुर्लक्ष करतो. इतकेच नव्हे तर अनेक शारीरिक आजार उदाहरणार्थ मधुमेह हृदयविकार ब्लड प्रेशर यासारखे आजारांची सुरुवात देखील ताणतणावामुळे होते.  योग्य त्या वेळेवर आपण जर आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेतली नाही तर ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक होऊ शकते. त्याचप्रमाणे शारीरिक आजारांमुळे सुद्धा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. बराच काळ असलेला आजारपण आणि त्यामुळे आपल्या कामावर आणि व्यवसायिक करिअरवर देखील परिणाम होतो.
त्यामुळे मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्यासोबत तितकेच महत्त्वाचे आहे.  

व्यसनाधिनता, दारू तंबाखू सिगारेट सारखे व्यसनांमुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात . व्यसन हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. माणूस ताण तणाव कमी करण्यासाठी कधीकधी व्यसन करतो. ज्याने आपल्याला तात्पुरते बरे वाटते  पण यागोष्टी ताण तणाव कमी न करता मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम करतात. व्यसनामुळे शारीरिक आजार निर्माण होतात जसे मधुमेह ज्याच्यामुळे आपल्या शरीराला जास्तीत जास्त नुकसान होऊ शकते. सोबतच व्यसनांमुळे औषधांचादेखील आपल्या शरीरावर परिणाम कमी होतो. 

मानसिक आरोग्ययासाठी आपण जर काळजी घेतली तर आपण बरेच शारीरिक आणि मानसिक आजार टाळू शकतो, तर ते कसे करायचे ?

सर्वात प्रथम म्हणजे झोप. कमीत कमी सहा ते सात तास झोप घेतली पाहिजे ,जी आपल्या शरीराला आणि मनाला आराम देते.  वेळेवर लवकर झोपणे आवश्यक आहे. त्यानंतर पौष्टिक आहार आणि पाणी हे आपल्या शरीराला ताणतणाव सहन करण्याची ताकद देतात.  झालेली झीज भरून काढतात.  योग, मेडिटेशन, चालणे ,जॉगिंग करणे ,कामा व्यतिरिक्त कुठलाही प्रकारचा व्यायाम हा शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगला असतो.  व्यायाम केल्याने एन्डोरफीन नावाचे रसायन आपल्या शरीरात तयार होते जे आपल्याला दिवसभर प्रसन्न ठेऊन सकारात्मक मानसिक आरोग्य जपण्यास मदत करते.  

कामातून वेळ काढून आपल्या जवळच्या नातेवाइकांना, मित्रांना  भेटा. आपले मन मोकळे करा. हास्य विनोद आनंद यासारख्या गोष्टी आपल्या मानसिक आरोग्यासाठी विटामिन चे काम करतात.आपण आपल्या मनात अनेक गोष्टी कोंडून ठेवतो ज्याच्या मुळे आपले मानसिक आरोग्य बिघडू शकते. आपण बोलायला हवे, आपल्या जवळच्या व्यक्तीसमोर बोलवून  मन मोकळे करा. एखादी कुठली गोष्ट आपल्याला वाईट वाटत असेल तर रडून आपले मन मोकळे करा. एखादी गोष्ट लिहून सुद्धा आपण आपले मन मोकळे करू शकतो. 

ताणतणाव टाळण्यासाठी आपले काम वेळेचे वेळेवर करा. जर असं वाटत की कुठलीही गोष्ट हातातून निघून जात असेल तर जवळच्या व्यक्तिची मदत घ्या. ताणतणाव दूर करण्यासाठी  आपण  तणाव ग्रस्त आहोत  याची जाणीव असणे  व ते स्वीकारणे अत्यंत गरजेचे आहे आपण जेव्हा ही गोष्ट विकार तो तेव्हाच त्याचा उपाय शक्य आहे ताण तणाव टाळण्यासाठी व्यसन हा उपाय नाही त्यामुळे व्यसनांपासून दूर राहा.  

या प्रकारे जर आपण काळजी घेतली तर आपलं मानसिक आरोग्य सकारात्मक होऊ शकते. जसे आपले शरीर आजारी पडू शकते तसंच आपले मनदेखील आजारी पडू शकत तर ते कसे ओळखावे जर तुम्हाला अस वाटत ताणतणाव वाढत आहे आणि त्यामुळे जर तुमची झोप बिघडत आहे, भूक कमी होत आहे, चिडचिड होत आहे किंवा उदासीन वाटत आहे सतत भीती वाटणे सतत चिंता होणे  चंचल वाटणे  कामात लक्ष न लागणे खूप दिवसापासून डोके दुखणे कामात मन न लागणे  कामाच्या ठिकाणी  चुका होणे  कामात लक्ष न लागणे लगेच राग येणे सतत थकवा जाणवणे तर मानसोपचार तज्ञांना भेटून त्याच्यावर ताबडतोब उपचार करणे गरजेचे आहे. काही रासायनिक बदलांमुळे देखील या गोष्टी होत असतात जे काही गोळ्या नियमित घेऊन देखील बरे केले जाऊ शकते. सर्वात महत्वाचे म्हणजे हे उपचार वेळेवर घेणे खूप महत्वाचे आहे तसे न केल्यास, त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यास काही कालांतरानंतर तेच त्रास औषधांनी देखील बरे होत नाहीत किंवा औषधांचा फारसा परिणाम दिसून येत नाही.