मुलांमधील मानसिक समस्या व उपाय

रात्री अंथरुण ओले करणे: 
शक्यतो झोपण्यापूर्वी १ तास तरी त्याला कुठलेही पेय देऊ नये.
झोपण्याच्या आधी त्याला प्रसाधनगृहात जाऊन यायला सांगावे.
ज्या वेळी मूल अंथरुण ओले करते, त्याच्या १५ मिनिटे आधी गजर लावून त्याला उठवावे आणि प्रसाधनगृहात नेऊन आणावे.
काही दिवसांनंतर गजर झाल्यावर मूल स्वतःच उठून प्रसाधनगृहात जाऊ लागेल, असे उत्तेजन त्याला द्यावे. त्यानंतर गजराच्या घड्याळाचे त्याच्यापासूनचे अंतर हळूहळू वाढवत जावे. मग गजर नसला, तरी मूत्राशय भरल्यावर त्याला जाग येईल.
ज्या रात्री त्याने अंथरुण ओले केले नसेल, त्याच्या दुसर्‍या दिवशी त्याला पारितोषिक द्यावे, म्हणजे त्याला स्वतःहून प्रयत्न करायला प्रोत्साहन मिळेल.
मूल झोपल्यानंतर पहिली ५ मिनिटे ‘जेव्हा मूत्राशय भरेल, तेव्हा तुला जाग येईल. जाग आल्यानंतर तू प्रसाधनगृहात जाऊन येशील आणि परत गाढ झोपी जाशील’, अशी सूचना सतत कमीत कमी दोन मास तरी द्यावी.

मुलांना अंधार, झुरळे, पाली इत्यादी ची भीती वाटणे: 
ज्या वेळी वरीलपैकी एखाद्या कारणामुळे मूल घाबरलेले असेल, त्या वेळी त्याला प्रेमाने जवळ घ्यावे आणि धीर द्यावा. त्याची चेष्टा करू नये किंवा त्याला रागावू नये.
अंधाराची भीती जावी; म्हणून त्याला आधी दिवा लावून झोपायला सांगावे. थोड्या थोड्या दिवसांच्या अंतराने ‘अल्प उजेड पडेल’, असा दिवा लावावा. याची त्याला सवय झाली, म्हणजे नंतर दिवा लावला नाही, तरी मूल न घाबरता झोपू शकते.

नखे कुरतडणे, अंगठा चोखणे, केस ओढणे इत्यादी सवयी: 
मुलांना नखे कुरतडल्याने होणारे अपाय समजावून सांगावे. मुल जर अधून मधून नखे कुरतडतांना दिसले, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणेच उत्तम कारण काही वेळेला हट्टी मुले न ऐकण्याचा भाग म्हणून ते जाणून बुजून करतात. मात्र त्याला नखे कुरतडण्याची सवय लागली असेल, तर नखांतील घाण पोटात गेल्यामुळे कसा अपाय होतो, हे समजावून सांगितले पाहिजे. मुलींना ‘तू नखे कुरतडल्यास ती चांगली दिसत नाहीत; पण नखे न कुरतडल्याने हात सुंदर दिसतात. नखांना तेल लावून ती मऊ ठेवल्यास ती कुरतडण्याचे प्रमाण अल्प होते; कारण मऊ नखे कुरतडणे मुलांना आवडत नाही.
मूल झोपल्यानंतर पहिल्या ५ मिनिटांत सूचना देणे : मूल झोपल्यानंतर पहिल्या ५ मिनिटांत आपण जागेपणी सांगतो, तसे नखे कुरतडण्यविषयी समजावून सांगावे. नंतर ‘नखे कुरतडायला प्रारंभ करताच तुला त्याची जाणीव होईल आणि तू ते थांबवू शकशील’, अशी सूचना द्यावी; कारण झोपेची पहिली ५ मिनिटे संमोहनावस्थेसारखी असतात. त्या कालावधीत सूचनांचा चांगला परिणाम होतो.
वाईट सवय सुटण्यासाठी बक्षिसे देणे : कधी कधी ‘नखे कुरतडली नाहीस, तर बक्षिसे देऊ’, असे सांगून मुलाला अयोग्य सवय सोडण्यासाठी उत्तेजन देता येते.
अघोरी उपचार करणे टाळावे : नखाला कडू औषध लावणे, चिकटपट्टी, स्टिकींग प्लास्टर लावणे इत्यादी उपचार मुळीच करू नयेत. अशाने ती सवय वाढण्याचा संभव असतो.
अंगठा चोखणे, केस ओढणे इत्यादी सवयी असल्यासही वरीलप्रमाणे उपायपद्धत राबवू शकतो.

खाण्या-पिण्याच्या आवडी-निवडी: 
मुलांच्या खाण्या-पिण्याच्या आवडी-निवडी असतील, तर त्याच्यासाठी आई-वडिलांनी जरा अधिक वेळ द्यावा. म्हणजे ‘आई-वडिलांचे आपल्याकडे लक्ष आहे’, हे त्यांना जाणवते आणि त्यांचे गार्‍हाणे करण्याचे प्रमाण न्यून होते.
मुलांना कोणताही पदार्थ खाण्याचा आग्रह करणे टाळावे : आई वडिलांनी मुलाला ‘एखादी भाजी खाल्लीच पाहिजे’, असा आग्रह करू नये. त्याने एखादा पदार्थ खाल्ला नाही, तर काही आठवडे तो पदार्थ त्याला मुळीच देऊ नका. परत देतांना तो वेगळ्या स्वरूपात द्यावा, उदा. पालेभाजी आवडत नसेल, तर पालक, मेथी घालून परोठे करून देणे किंवा अशा भाज्या घालून त्यांना घावन करून देणे, असे पदार्थांचे स्वरूप पालटून द्यावे. म्हणजे मुलेही ते पदार्थ आवडीने खातील.
खाण्या-पिण्याच्या वेळेविषयी फार काटेकोरपणा दाखवू नये. दोन जेवणांच्या मधल्या वेळेत जर त्याला एखादा खाऊ खावासा वाटला, तर अवश्य द्यावा. तेव्हा ‘सकाळी जेवायच्या वेळी जेवला नाहीस आणि आता मात्र खाऊ खायला पाहिजे’, असे म्हणून रागावू नये.
जेवण वाढायच्या ५-१० मिनिटे आधी ‘आता जेवण वाढणार आहे’, अशी सूचना त्याला द्यावी, म्हणजे स्वतःचा खेळ किंवा अभ्यासाची पुस्तके इत्यादी आवरायला त्याला वेळ मिळतो.
मुलांसमवेत जेवतांना आई-वडिलांनी घ्यायची काळजी
जेवणाच्या वेळी सभोवतालचे वातावरण प्रसन्न असले पाहिजे.
जेवणाकडे दुर्लक्ष होऊ नये; म्हणून मुलांच्या जवळ खेळण्यासारख्या वस्तू ठेवू नयेत.
मूल जेवत असतांना स्वतःच्या आवडीनिवडीची चर्चा करू नये.
जेवतांना त्याचे प्रगतीपुस्तक, खोड्या किंवा चुका यांविषयी चर्चा करू नये.

आकांडतांडव करणे: 
मुलाला आकांडतांडव करण्याची सवय जडली की, आई-वडिलांच्या डोकेदुखीला प्रारंभ होतो.
अशा वेळी त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करावे. त्याच्या अवाजवी मागण्या मुळीच पुरवू नयेत.
मूल शांत झाल्यावर त्याला आधी आकांडतांडव करण्यामागील कारण विचारावे. बहुतेक वेळा कारण क्षुल्लकच असते. त्या वेळी न रागावता प्रेमाने त्याची समजूत काढावी. त्याचे मन दुसरीकडे कुठेतरी गुंतेल, असे करावे, उदा. संगीत, हस्तव्यवसाय, एखादा खेळ यांची आवड त्याच्यात निर्माण करावी.

चोरी करणे: 
मुलाने चोरी केल्यास त्याला रागावून मारू नये. तसे करणे अयोग्य आहे; मात्र ‘आपण केलेली कृती आई-वडिलांना मुळीच आवडलेली नाही’, हे त्याला कळायला हवे.
चोरी करण्यामागील कारणे आणि अडचणी समजून घ्या : मूल तसे का वागले, हे त्याच्याकडून समजून घेऊन अडचणीचे निराकरण करावे. कधी कधी आई-वडिलांवरील रागामुळे मुले अशा गोष्टी करतात. त्यामुळे त्यांचा राग कशाविषयी आहे, ते जाणून घेऊन तो घालवण्याचा प्रयत्न करावा.
त्याने चोरी करून दुसर्‍याची वस्तू उचलून आणल्याचे लक्षात आल्यास त्याला ती लगेच परत करायला सांगावी.
चुकांसाठी शिक्षा करणे : काही वेळा शिक्षाही करावी लागते, उदा. त्याने चोरलेले पैसे व्यय केले असतील, तर घरातील कामे करणे, स्वतःची ताट-वाटी धुवायला लावणे, खाऊ न देणे अशा प्रकारच्या शिक्षा कराव्यात. या गोष्टीने आवर पडलेला नाही, हे लक्षात आल्यावर मानसोपचार तज्ञांचे मत अवश्य घ्यावे. जर त्याने पैसे व्यय केले असतील, तर त्यासाठी शिक्षा म्हणून जेवण न देणे किंवा घरातील शारीरिक श्रम होणारी कामे करण्यास सांगावे.
मुलाला जाणीव होईल, अशा पद्धतीने त्याच्याशी बोलणे
घरातील पैसे नाहीसे झाले असतील, तर ‘तू अमुक अमुक पैसे घेतलेले आहेस. ते लगेच परत दे आणि यापुढे तुला पैसे लागतील, तेव्हा माझ्याकडे मागत जा. मग काय करायचे, ते बघू’, असे त्याला सांगावे. जर त्याने चोरी केल्याचे नाकारले, तर त्याच्याशी वाद घालू नये किंवा ते मान्य करायची त्याला गळही घालू नये.
चोरी केल्यावर त्याला ‘तू असे का केलेस’, असा प्रश्न विचारू नये. मग मूल खोटे काहीतरी सांगते. केवळ त्याला एवढेच म्हणावे, ‘तुला पैसे हवे होते, हे तू मला सांगितले नाहीस, त्याचे वाईट वाटले.’

खोटे बोलणे: 
खोटे बोलण्याची कारणे : खरे बोलले, तर शिक्षा होईल किंवा आई-वडील रागावतील; म्हणून मुले खोटे बोलतात. काही मुले स्वतःविषयी फुशारकी मारण्यासाठी किंवा स्वतःला महत्त्व मिळावे, यासाठी खोटे बोलतात.
खोटे बोलण्यामागील कारण शोधून मुलाला विश्वासात घेऊन समजवावे : मुले कशासाठी खोटे बोलली, हे शोधून त्याप्रमाणे उपाय करावे, उदा. शिक्षेची भीती असल्यास त्याला विश्वासात घेऊन ‘शिक्षा करणार नाही’,असे पटवून द्यावे, म्हणजे तो खरे सांगेल. मग खोटे का बोलू नये, हे त्याला समजवावे.
खोट्या गोष्टी सांगणे टाळण्यासाठी करावयाची क्ऌप्ती : जर मूल न्यूनगंडामुळे खोटी फुशारकी दाखवत असेल, तर त्याच्यातील चांगले गुण, त्याची चांगली वागणूक इत्यादी गोष्टींकडे त्याचे लक्ष वेधावे. त्यामुळे त्याचा स्वतःविषयीचा आत्मविश्वास वाढतो आणि तो खोट्या गोष्टी सांगणे टाळतो.

अभ्यास न करणे:
शाळेतून आल्यावर मुलांना लगेच अभ्यासाला बसवू नका : सध्या शाळेत मुलांना पुष्कळ विषय असतात आणि तितकाच गृहपाठही दिला जातो. त्या ओझ्याने त्यांना अभ्यासाचाच कंटाळा येणे स्वाभाविक आहे. अशा वेळी शाळेतून आल्यावर लगेचच मुलाला अभ्यासाला न बसवता त्याचे खाणे-पिणे झाल्यानंतर एक घंटा त्याला खेळू द्यावे आणि मग अभ्यासाला बसवावे.
मुलाची इतर विषयातील आवड लक्षात घ्या : कधी कधी मुलाला दुसर्‍या विषयात आवड निर्माण झाल्याने त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. अशा वेळी ही आवड जर चांगली असेल, उदा. संगीत, चित्रकला किंवा एखादा खेळ याच्यात त्याला रस निर्माण झाला असेल, तर त्याला ते करू द्यावे. अर्थात वेळेचे बंधन अवश्य घालावे. तो दैनंदिन अभ्यास प्रतिदिन करील, हेही बघावे.
शाळेत येण्या-जाण्याच्या नियमिततेच्या संदर्भात मुलाचा आढावा घ्या. पालकांनी मधून मधून शाळेत जाऊन मूल वेळेवर अन् नियमितपणे शाळेत येते कि नाही आणि त्याची वर्तणूक कशी आहे, याकडेही लक्ष ठेवावे; कारण सध्या ‘इलेक्ट्रॉनिक गेम्स’कडे मुले बरीच आकर्षित झालेली आढळतात. काही मुले तर चक्क शाळा बुडवून तेथे जातात. अशा खेळांसाठी पैसा लागतो. त्यासाठी घरचे पैसे चोरणे चालू होते आणि अभ्यासाकडे पूर्ण दुर्लक्ष होते. असे झाल्यास मुलाची शाळासुद्धा पालटणे आवश्यक होते. नाहीतर पुढे ती मुले गुन्हेगारीच्या जगात खेचली जातात.
एखाद्या विषयात चांगले गुण मिळाल्यास त्याचे कौतुक करावे. छोटीशी भेट दिल्यास त्याला ‘अजून अभ्यास करावा’, असे वाटेल.

मुख्य म्हणजे घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असावे. आई-वडिलांच्या समस्यांनी मुलाची मनःशांती ढळू नये, याविषयी जागरूक असावे.
एकाग्रता वाढवण्यासाठी संमोहनशास्त्राचा वापर केल्यास पुष्कळ लाभ होतो.
सोप्या घरगुती मानसोपचारांनी मुलांच्या बहुतेक समस्या दूर करता येतात. तसेच आई-वडिलांच्या योग्य वागण्याने त्याचे व्यक्तीमत्त्वही निरोगी रहायला साहाय्य होते. त्यामुळे पुढे मानसिक विकार व्हायचा संभव उणावतो.

सकारात्मक मानसिक आरोग्य


मधुमेह, रक्तदाबाचे आजार वगैरे आजार आपल्याला माहित आहेत, जे एक शारीरिक आजार आहेत. शारीरिक आजाराचा आपल्या मानसिक आरोग्याशी काही संबंध असतो का ? हो , खरतर या दोन्ही गोष्टींमध्ये अत्यंत जवळचा संबंध आहे. 

आपण माणूस म्हणजे दोन गोष्टी. एक म्हणजे शरीर आणि दुसरे म्हणजे मन. जसे एका कम्प्युटरमध्ये त्याचा हार्डवेअर असतो जे आपण  डोळ्याने बघतो ते म्हणजे जणू आपले शरीर आणि तो कम्प्युटर्स चालविण्यासाठी लागणारी ऑपरेटिंग सिस्टिम किंवा सॉफ्टवेअर म्हणजे आपले मन. आणि आपण नेहमी प्रमाणे बाहेरून दिसणाऱ्या गोष्टीनाच  जास्त महत्त्व देतो आणि ज्या गोष्टींमुळे त्या वस्तूत चालतात त्याच्याकडे दुर्लक्ष करतो तसंच काही आपल्या मानसिक आरोग्य सोबत होत असते. आपण नेहमी आपल्या बाह्य सौंदर्याकडे लक्ष देतो. त्याची काळजी घेतो. वेगळे वेगळे क्रीम्स लावतो. शरीर सूडोल दिसणायसाठी व्यायाम करतो. चांगले कपडे घालतो. जसे आपल्या कॉम्पुटर किंवा मोबाइलला आपण एखादा स्क्रीन कव्हर बसवतो, पण तो चांगला चालण्यासाठी अँटी व्हायरस टाकताना दहा वेळा विचार करतो. तसेच काही आपण आपल्या मानसिक आरोग्यासोबत करतो. आपले मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी आपण काहीही करत नाही. कधीच काळजी घेत नाही. ते बिघडल्यास ते दुरुस्त करून घेण्याची इच्छाशक्ती देखील आपल्यामध्ये नसते. मानसिक आजारासाठी लागण्याच्या औषधोपचार कडे देखील आपण  दुर्लक्ष करतो. इतकेच नव्हे तर अनेक शारीरिक आजार उदाहरणार्थ मधुमेह हृदयविकार ब्लड प्रेशर यासारखे आजारांची सुरुवात देखील ताणतणावामुळे होते.  योग्य त्या वेळेवर आपण जर आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेतली नाही तर ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक होऊ शकते. त्याचप्रमाणे शारीरिक आजारांमुळे सुद्धा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. बराच काळ असलेला आजारपण आणि त्यामुळे आपल्या कामावर आणि व्यवसायिक करिअरवर देखील परिणाम होतो.
त्यामुळे मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्यासोबत तितकेच महत्त्वाचे आहे.  

व्यसनाधिनता, दारू तंबाखू सिगारेट सारखे व्यसनांमुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात . व्यसन हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. माणूस ताण तणाव कमी करण्यासाठी कधीकधी व्यसन करतो. ज्याने आपल्याला तात्पुरते बरे वाटते  पण यागोष्टी ताण तणाव कमी न करता मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम करतात. व्यसनामुळे शारीरिक आजार निर्माण होतात जसे मधुमेह ज्याच्यामुळे आपल्या शरीराला जास्तीत जास्त नुकसान होऊ शकते. सोबतच व्यसनांमुळे औषधांचादेखील आपल्या शरीरावर परिणाम कमी होतो. 

मानसिक आरोग्ययासाठी आपण जर काळजी घेतली तर आपण बरेच शारीरिक आणि मानसिक आजार टाळू शकतो, तर ते कसे करायचे ?

सर्वात प्रथम म्हणजे झोप. कमीत कमी सहा ते सात तास झोप घेतली पाहिजे ,जी आपल्या शरीराला आणि मनाला आराम देते.  वेळेवर लवकर झोपणे आवश्यक आहे. त्यानंतर पौष्टिक आहार आणि पाणी हे आपल्या शरीराला ताणतणाव सहन करण्याची ताकद देतात.  झालेली झीज भरून काढतात.  योग, मेडिटेशन, चालणे ,जॉगिंग करणे ,कामा व्यतिरिक्त कुठलाही प्रकारचा व्यायाम हा शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगला असतो.  व्यायाम केल्याने एन्डोरफीन नावाचे रसायन आपल्या शरीरात तयार होते जे आपल्याला दिवसभर प्रसन्न ठेऊन सकारात्मक मानसिक आरोग्य जपण्यास मदत करते.  

कामातून वेळ काढून आपल्या जवळच्या नातेवाइकांना, मित्रांना  भेटा. आपले मन मोकळे करा. हास्य विनोद आनंद यासारख्या गोष्टी आपल्या मानसिक आरोग्यासाठी विटामिन चे काम करतात.आपण आपल्या मनात अनेक गोष्टी कोंडून ठेवतो ज्याच्या मुळे आपले मानसिक आरोग्य बिघडू शकते. आपण बोलायला हवे, आपल्या जवळच्या व्यक्तीसमोर बोलवून  मन मोकळे करा. एखादी कुठली गोष्ट आपल्याला वाईट वाटत असेल तर रडून आपले मन मोकळे करा. एखादी गोष्ट लिहून सुद्धा आपण आपले मन मोकळे करू शकतो. 

ताणतणाव टाळण्यासाठी आपले काम वेळेचे वेळेवर करा. जर असं वाटत की कुठलीही गोष्ट हातातून निघून जात असेल तर जवळच्या व्यक्तिची मदत घ्या. ताणतणाव दूर करण्यासाठी  आपण  तणाव ग्रस्त आहोत  याची जाणीव असणे  व ते स्वीकारणे अत्यंत गरजेचे आहे आपण जेव्हा ही गोष्ट विकार तो तेव्हाच त्याचा उपाय शक्य आहे ताण तणाव टाळण्यासाठी व्यसन हा उपाय नाही त्यामुळे व्यसनांपासून दूर राहा.  

या प्रकारे जर आपण काळजी घेतली तर आपलं मानसिक आरोग्य सकारात्मक होऊ शकते. जसे आपले शरीर आजारी पडू शकते तसंच आपले मनदेखील आजारी पडू शकत तर ते कसे ओळखावे जर तुम्हाला अस वाटत ताणतणाव वाढत आहे आणि त्यामुळे जर तुमची झोप बिघडत आहे, भूक कमी होत आहे, चिडचिड होत आहे किंवा उदासीन वाटत आहे सतत भीती वाटणे सतत चिंता होणे  चंचल वाटणे  कामात लक्ष न लागणे खूप दिवसापासून डोके दुखणे कामात मन न लागणे  कामाच्या ठिकाणी  चुका होणे  कामात लक्ष न लागणे लगेच राग येणे सतत थकवा जाणवणे तर मानसोपचार तज्ञांना भेटून त्याच्यावर ताबडतोब उपचार करणे गरजेचे आहे. काही रासायनिक बदलांमुळे देखील या गोष्टी होत असतात जे काही गोळ्या नियमित घेऊन देखील बरे केले जाऊ शकते. सर्वात महत्वाचे म्हणजे हे उपचार वेळेवर घेणे खूप महत्वाचे आहे तसे न केल्यास, त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यास काही कालांतरानंतर तेच त्रास औषधांनी देखील बरे होत नाहीत किंवा औषधांचा फारसा परिणाम दिसून येत नाही. 

डिप्रेशन व त्यावर मात

डिप्रेशन किंवा नैराश्य ही भावना फक्त उदास असणे किंवा एकाकी वाटणे इतकेच नव्हे तर हा एक मानसिक आजार आहे. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये नैराश्याचे प्रमाण जास्त आहे. वाढत्या स्पर्धेमुळे जगभरात नैराश्याचा आकडा वाढत चालला आहे. जगात प्रत्येक वर्षी आठ लाख लोक आत्महत्या करत असतात त्यात नुसत्या भारत देशाचा आकडा 135000 इतका मोठा आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अनुसार भारतात पाच करोड लोक नैराश्यग्रस्त आहेत.


नैराश्याची बरीच कारणे आहेत. मेंदूमधील रासायनिक बदल हे प्रमुख कारण आहे. सिरोटोनिन, नॉरएपिनेफ्रिन आणि डोपामिन नावाची तीन महत्वाची रसायने आहेत, ज्यांच्या पातळीतील फरकाने निराशाच सुरुवात होते. सामाजिक ताणतणाव, नोकरीची चिंता, कुटुंबात किंवा नोकरीच्या ठिकाणी चालू असलेला शारीरिक, मानसिक किवा लेंगिक छ्ळ, कुठूम्बातील इतर व्यक्ती सोबतचे मतभेद, कुठूम्बातील अतिशय आवडत्या व्यक्तीची मयत, बराच काळ असलेला आजारीपणा, दारूचे व्यसन ही काही प्रमुख कारणे आहेत. नैराश्य अनुवंशिक सुद्धा असू शकतो.

नैराश्याची  काही लक्षणे:
नैराश्यग्रस्त व्यक्तीला प्रामुख्याने झोपेच्या तक्रारी असतात. नेहमीपेक्षा लवकर जाग येणे, झोप पूर्ण न होणे, झोप जरी लागली असेल तर सकाळी झोप पूर्ण न झाल्यासारखे वाटणे. त्यामुळे दिवसभर टवटवीत न वाटणे. जास्त झोप येणे किंवा सतत जोपून राहावे असे वाटणे सुद्धा नैराश्याची लक्षण असू शकते.
भूक कमी होऊन वजन कमी होणे. जेवायची इच्छा न राहणे. भूक नसतानाही सतत काहीतरी खात राहणे सुद्धा नैराश्याची एक लक्षण असू शकते.
उदास वाटणे ,कंटाळा येणे, जीवनात रस नसल्यासारखे वाटते, कुठल्याही गोष्टीत मन न लागणे, कोणाशीही बोलू न वाटणे ,अगोदर ज्या गोष्टी आवडीने करायच्या त्या गोष्टीची रुची नसणे. सतत रडू येणे, एकटेपणा जाणवणे, अभ्यासात व कामात एकाग्रता न येणे त्या मुळे चुका होणे.
सतत आत्महत्येचे विचार येणे हे सर्वात गंभीर लक्षण आहे.

आपल्या कुठूम्बातील वक्ती मध्ये नैराश्याची लक्षणे कशी ओळखावी:
व्यक्तीच्या स्वभावात बदल होणे, आवडीनिवडीत फरक पडणे, अति चिडचिडेपणा येणे, झोप व भूक नसण्याच्या सारख्या तक्रारी येणे,  नकारात्मक गोष्टी बोलत राहणे. मारण्याच्या गोष्टी बोलत राहणे. कामावर न जाणे.

नैराश्यावर उपचाराची गरज आहे का ?
हो, कारण नैराश्याचा परिवारावर, समाजावर व आपल्या स्वतःच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात, ते नैराश्यग्रस्त व्यक्ती ने समजून घ्यायला हवे. झोपेच्या तक्रारी मुळे शारीरिक स्वास्थ्य बिघडते, उदासीन व्यक्ती आपल्या शरीराची देखील काळजी घेत नाहीत. कुठला आजार असेल तर त्याच्याकडे व त्याच्या औषधोपचारा कडेसुद्धा दुर्लक्ष केले जाते. त्याला पर्याय म्हणून अशा व्यक्ती व्यसनाधीन होऊ शकतात. नैराश्यग्रस्त व्यक्ती परीवारापासुन लांब होतात, घरातील वातावरण बिघडते, वाद होतात, मुलांमध्येसुद्धा त्याचा वाईट परिणाम होतो. कामात चुका होतात, नोकरीवर अनुपस्थितीमुळे आपल्या करिअरवर देखील फरक पडू शकतो. आत्महत्या हा नैराश्याचा सर्वात वाईट परिणाम आहे.

नैराश्यावर उपाय
वरील कुठल्याही प्रकारची लक्षणे स्वतःमध्ये किंवा आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींमध्ये दिसून आल्यास त्याचे उपचार करणे गरजेचे आहे. यासाठी सर्वप्रथम तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात या वास्तव स्थितीचा स्वीकार करा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला विश्वास असायला हवा की तुम्ही यातून पुर्णपणे नक्कीच बरे व्हाल व पुन्हा आनंदी आयुष्य जगू शकाल. तुम्ही तुमच्या मनातील भावना तुमच्या जवळच्या मित्र-मंडळी, कुटूंबातील एखाद्या जिवलग व्यक्तीला सांगू शकता. तुमचे काम वेळेत पूर्ण करण्याची सवय स्वतःला लावून घ्या म्हणजे त्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल व नैराश्य येणार नाही.
जीवनात घडलेल्या सर्व छोट्या-मोठ्या चांगल्या गोष्टींकडे स्वत:चे लक्ष वेधा. तुमच्या मनाला उभारी आणणा-या गोष्टी शोधा. तुम्हाला आनंद वाटेल अशा छोट्या छोट्या गोष्टी करा. उदासीन वाटू लागल्यास एखादा मनोरंजक व्हिडीओ,सुंदर फोटो अथवा निसर्गसौदर्य पहा. टिव्हीवरील नकारात्मक बातम्या व नकारात्मक गोष्टी स्थिती अधिक खराब करु शकतात, त्यामुळे अशा गोष्टींपासून दूरच रहा. फ्रेंड, कलिग, प्रियकर/प्रियसी किंवा एखादी कुटुंबातील व्यक्ती अशा कोणत्याही नात्यात तुम्हाला वाईट अनुभव येत असेल तर त्या व्यक्तीपासून स्वतःला दूर ठेवा. पोषक आहार घ्या, आहारात विविध रंगाच्या पदार्थांचा समावेश करा. तुम्हाला आवडणा-या गोष्टींची यादी करा.

जशी शारीरिक आजार औषध उपचारांनी बरे होतात तसेच मानसिक आजार सुद्धा औषधांनी बरे होतात. मेंदू घडलेल्या रासायनिक बदल ज्याच्यामुळे नैराश्य निर्माण होत आहे तो बदल औषधानी पूर्ववत करण्यास मदत होऊ शकते. आत्महत्येचे विचार येणे सुद्धा औषधोपचाराने कमी केले जाऊ शकते. त्यासाठी लवकरात लवकर आपल्या मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या.

डॉ संपदा अणवेकर
मानसोपचार तज्ञ

झोप, झोपेचे आजार व त्यासाठी उपाय

झोप हा आपल्या  दिनचर्येचा भाग आहे. मेंदू, अवयव यांना विश्रांती देणारा कालावधी, ज्यावेळी आपण अचेतन अवस्थेत असतो.


झोपेचे दोन भाग :
१. तीव्र चक्षु गती निद्रा : (REM) हि अवस्था एकूण झोपेच्या १/५ हिस्सा असते. यावेळी आपल्या बुब्बुळांची गती तीव्र होते. आपण स्वप्ने बघतो. मेंदू सक्रिय असला तरी बाकी मांसपेशी खूप सक्रिय असत नाहीत.
 २. मंद चक्षु गती निद्रा : (non REM) : या वेळी मेंदू शांत असतो. रक्तामध्ये हॉर्मोन्स तयार होतात आणि दिवसभरात  झालेली शरीराची हानी दुरुस्त होते. हि अवस्था एकूण झोपेच्या १/४ हिस्सा असते. संपूर्ण रात्री मध्ये आपण ५ वेळा (REM व non REM) अवस्थेत असतो.



मुले साधारण १७ तास , किशोर वयात ९-१० तास, वयस्क लोक ८ तास  इतक्या झोपेची सर्वसाधारण गरज असते. वृद्धांना सुरुवातीचे ३-४ तास गाढ झोप लागते. त्या नंतर सहज जाग येते व हे स्वप्ने कमी पाहतात.

आपल्याला खरेच पुरेशी झोप मिळते का?
याचे उत्तर शोधण्यासाठी स्वतःला दोन प्रश्न विचारा. पहिला, दिवसा नेहमी झोप आल्यासारखे वाटते का? आणि दुसरा, अंथरुणावर पडल्यावर पहिल्या पाच मिनिटांत तुम्ही झोपी जाता का? यापैकी एक वा दोन्ही प्रश्नांची उत्तरे जर हो असतील, तर तुम्ही अपुऱ्या झोपेने किंवा इतर निद्राविकारांनी त्रस्त आहात.


काही कारणामुळे आपली झोप होऊ शकत नाही. जसे झोपेच्या जागी खूप आवाज, खूप थंड किंवा गरम वातावरण, बेड खूप अपुरा किंवा आरामदायक नसेल. झोपेच्या वेळा नियमित नसतील तर. आजूबाजूला झोपणाऱ्या व्यक्तीच्या सवयी तुमच्या पेक्षा वेगळ्या असतील तर. खूप उशिरा जेवण करत असाल तर. झोपे अगोदर चहा कॉफी ( ज्यात कॅफिन नावाचे रसायन असते) सिगारेट , दारू इ. आजारपण , ताप असेल तर.
भावनिक समस्या, कामाशी संबंधित तणाव, उदासीनता यातून निद्रानाश उद्भवू शकतो.


निद्रानाश म्हणजे काय ?
नैसर्गिक दैनंदिन जीवनचक्रामध्ये वेळेवर झोपे न येणे, झोप आल्यानंतर ती बराच वेळ टिकवून ठेवता न येणे, झोपेची वेळ पूर्ण झाली तरी सुद्धा झोप पूर्ण न झाल्यासारखे वाटणे याला 'निद्रानाश' असे म्हटले जाते जो मानसिक आरोग्याशी निगडित आहे.


                                                         
निद्रानाशाचे आणी झोपेच्या आजारांचे काही विशेष प्रकार आहेत. त्यांविषयी थोडक्यात जाणून घेऊ. 

डिलेड स्लीप फेज डिसऑर्डर :
आपल्या शरीरातील नैसर्गिक जैविक घड्याळ बिघडल्यास किंवा त्यात गडबड झाल्यास वेळीच झोप न लागता उशिरा लागते. जेव्हा दैनंदिन कामे करण्यासाठी जागे राहणे गरजेचे असते, तेव्हा त्या व्यक्तीला झोप येते. यात सर्वसाधारणपणे दिवसा, विशेषतः सकाळी झोप येणे, थकवा जाणवणे, मन एकाग्र न होणे आणि स्मरणशक्ती कमी होणे, ही लक्षणे दिसून येतात. लहान मुले आणि कुमार अवस्थेत हा निद्रानाश होतो.

अॅडव्हान्स स्लीप फेज डिसऑर्डर :
या प्रकारात जैविक घड्याळ पुढे जाते. म्हणजे नेहमीपेक्षा अगदी लवकर झोपी जाणे. त्यामुळे पहाटे साधारण तीन ते पाचदरम्यान जाग येऊन परत झोपच लागत नाही. हा प्रकार मुख्यतः ज्येष्ठ नागरिकांमधे अधळतो. 

नॉन २४ अवर स्लीप वेक सिंड्रोम :
या प्रकारात शरीराच्या घड्याळात २४पेक्षा जास्त तास असतात. त्यामुळे झोपेची वेळ सतत पुढे पुढे जाते. या प्रकारचा निद्रानाश अगदी कमी प्रमाणात आढळतो. मुख्यत्वे अंध व्यक्तींना हा त्रास होतो. 

जेट लॅग :
टाइम झोन बदलल्यामुळे हा त्रास होतो. शरीराचे घड्याळ आणि बाहेरील जगाचे घड्याळ त्यांच्या वेळेत तफावत निर्माण होते. आंतरराष्ट्रीय प्रवाशांना हा त्रास होतो.

शिफ्ट वर्क इनसोमेनिया :
सकाळ, दुपार आणि रात्रीच्या कामाच्या वेळा असणे. या वेळा फिरत्या असल्यामुळे झोपेची वेळ सतत बदलत राहते. यामुळे पचनसंस्थेचे विकार, हृदयरोग आणि निद्रानाश असे त्रास होण्याचा संभव असतो. 

ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्निया :
साध्या शब्दात घोरणे. झोपेत अगदी थोड्या कालावधीसाठी श्वास बंद होऊन जाग येते आणि पुन्हा नियमित सुरू होऊन झोप लागते. नाक आणि घसा या सुरुवातीच्या श्वसनमार्गातील कमजोरी आणि अडथळ्यांमुळे हा त्रास होतो. यामुळे दिवसा झोप येणे, नैराश्य, काम करण्याची क्षमता कमी होणे, चिडचिड इत्यादी लक्षणे दिसतात. 

नॉर्कोलेप्सी :
दिवसा अति आणि अपरिहार्यपणे झोप येणे. मेंदूतील झोप आणि जाग येण्याच्या केंद्रामध्ये बिघाड झाल्याने हा त्रास होतो. त्रस्त व्यक्ती अगदी बोलता बोलता किंवा गाडी चालवतानाही झोपी जातात. हा प्रकार अनुवंशिक असू असतो.

रेस्टलेस लेग सिंड्रोम : झोप येण्याच्या वेळी पायात खूप जळजळ होणे, दुखणे, खाज होणे असे प्रकार होतात. व्यक्तीला उठून थोडे चालल्यानंतर बरे वाटते. आपल्याला सतत पाय हलवणे गरजेचे वाटते. हि हालचाल आपण थांबवू शकत नाही. रात्री हि समस्या वाढते. कांही लोकांना लहानपणा पासून हा त्रास असतो. हा त्रास अनुवांशिक सुद्धा असतो. शरीरात लोहाची , पोषक आहाराची कमी असेल तरी हा त्रास होतो.  

झोपेत चालणे :
साधारणपणे लहान मुलांना हा त्रास होतो. वय वाढल्यानंतर तो कमी कमी होत जातो. ताण, ताप, औषधे, झोपेचे अनियमित वेळापत्रक ही यामागची काही कारणे आहेत. अशा रुग्णांना पुन्हा जागेवर झोपवा. जागे करू नका. दारे , खिडक्या बंद ठेवा. धारदार वस्तू जवळ ठेऊ नका.


नाईट टेरर : रोगी अर्धवट झोपेत व घाबरलेला असतो. परंतु पूर्ण जागे न होता तो पुन्हा झोपी जातो. रुग्णाला दुसऱ्या   दिवशी यातील काही लक्षात राहत नाही.


नाईट मेअर : रात्री बऱ्याच उशिरा भीतीदायक स्वप्ने पडतात. हि स्वप्ने लक्षात राहतात. संकटात  टाकणाऱ्या गोष्टी, (वादळ , रोग , मृत्यू , दुर्घटना ) अशामुळे भीतीदायक स्वप्ने पडतात.


निद्रानाश टाळण्यासाठी काय कराल ?
दिवसा वामकुक्षी घेणे टाळा.
रात्री भरपूर  खाणे टाळा.
धुम्रपान व मद्यपान टाळा. झोपण्यापूर्वी मद्यपान केल्यामुळे झोप येण्यास मदत होते हा चुकीचा समज आहे. मद्यपानामुळे  तुम्हाला झोप आली तरीही ती सुखकारक  झोप नसून यामुळे तुम्हाला रात्री  सारखी जाग येईल. सिगारेटमधील  ‘निकोटीन’ सारख्या घटकामुळे झोपेचे चक्र बिघडते .
रात्री चहा / कॉफीचे सेवन टाळा. कारण यात ‘ कॅफिन’ नावाचा उत्तेजक घटक असतो तसेच कॅफिनमुळे रात्री वारंवार मुत्रविसर्जनासाठी शौचालयात जाणे वाढते.
झोपताना खूप पाणी पिऊ नका. रात्री झोपण्यापूर्वी खूप पाणी प्यायल्याने मुत्रविसर्जनासाठी वारंवार उठावे लागल्यामुळे झोपमोड होऊ शकते .
झोप येण्यापुर्वीच बिछान्यावर पडू नका. मेंदू थकल्यानंतर व  झोप आल्यावरच  बिछान्यावर झोपायला जा.
झोपण्यापूर्वी व्यायाम करणे टाळा. व्यायाम हा सकाळी उठल्यावरच करावा. संध्याकाळी उशिरा व्यायाम केल्याने शरीराचे चलन वाढते व निद्रानाश होण्याची शक्यता वाढते.
झोपण्यापूर्वी विचार/चिंता करणे टाळा.
चुकीच्या स्थितीत झोपणे टाळा. झोपण्याची खोली व अंथरूण आरामदायक असावे. खोली खूप गरम किंवा थंड असू नये. गादी खूप मऊ किंवा खूप कडक असू नये. गादी खूप कडक असेल तर खांदा व कमरेवर जास्त दबाव पडतो. गादी खूप मऊ असेल तर शरीर दबले जाते व पाठीला ते त्रासदायक होते. अशा वेळी गादी बदलणे योग्य ठरते.
झोप येत नसेल तर वाचन करणे,  संगीत ऐकणे , टी व्ही बघणे अश्या कांही गोष्टी करा ज्यामुळे तुम्हाला हलके वाटेल.
नियमित दिनचर्या आखा. निश्चित वेळीच उठा.


वरील उपाय करून देखील आपणास झोप येत नसेल तर डॉक्टरांची मदत घ्यावी. ते आपल्या समस्या जास्त चांगल्या ओळखतात. त्यावर उपाय सुचवतील. आपल्या निद्रानाशाचे कारण हे शारीरिक आहे, औषध, किंवा मानसिक आहे हे डॉक्टर सांगू शकतील. कॉग्निटिव्ह बिहेविअर थेरपी "निद्रानाशावर" समाधानकारक उपाय आहे. कॉग्निटिव्ह बिहेविअर थेरपी आपले चुकीचे विचार बदलते ज्यामुळे आपण चिंतीत आहात.


औषधे मदत करू शकतात का?
हो, उदासीनता कमी करणाऱ्या औषधांची चांगल्या झोपेसाठी मदत होऊ शकते. पण निद्रानाशाचा त्रास असलेल्या व्यक्ती अनेकदा झोपेच्या गोळ्या घेण्याचा मार्ग स्वीकारतात.  मात्र याचा अतिवापर केल्याचे नैसर्गिकरित्या झोप येण्याचे प्रमाण कमी होते. या औषधांचा परिणाम कमी काळ टिकतो त्यामुळे जास्त गोळ्या घेणे गरजेचे वाटते, गोळ्यांवर अवलंबून राहावे लागते. झोपेच्या गोळ्या या खूप कमी दिवस  घ्याव्या.  खूप दिवस आपण झोपेच्या गोळ्या वापरत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या हळू हळू कमी करा.


डॉ संपदा अणवेकर, मानसोपचार तज्ञ
चौपाड, सोलापूर.

Women Psychiatrists in India: A reflection of their contributions

The increasing number of women joining psychiatry is a relatively new phenomenon in the field of medicine. Keeping with the trends world over, the number of women psychiatrists in India is rising over the last two to three decades.
Introduction
Historically, psychiatry has often been considered to be associated with unpredictable and violent patients, and had a number of misconceptions attached to it. The trends are changing now. Reasons for psychiatry becoming a preferred career choice for women doctors can be traced to multiple factors. Psychiatry has gradually shifted out of the high walls of the mental hospitals to the neuropsychiatry clinics, counselling and gaining more acceptability in the society. Over and above this, women doctors have to juggle career and family responsibilities as domestic and child related duties have largely remained with them despite changing roles. The crucial career-intensive years in professional life that is residency and early years as junior residency coincide with the equally crucial period that is marriage, childbearing and child rearing in the personal life. A career in psychiatry allows doing justice to multiple roles in a better way than the other busy clinical and emergency branches like obstetrics, pediatrics, internal medicine, cardiology or surgery. Because of the possibility of predictable working hours, less emergencies, flexible working schedules and greater opportunities to interact with patients are one of the reasons me and my husband selected this branch as my carrier.
Research has documented that the working styles of female psychiatrists have been noted to be different from their male colleagues in some aspects. Many women psychiatrists are noted to be more empathic in approach. Their patients report better satisfaction levels as they are more likely to engage patients as active partners in the care by adopting a democratic style of communication. They spend a significantly greater proportion of time on preventive services and counselling, compared to their male colleagues. The day is not far when women shall also attain positions of authority and leadership in academics, professional organizations and medical institutions along with their male colleagues.
Statistics  
Number of Female psychiatrists in India
Women psychiatrists constitute 14.6% of the total membership (2829) of Indian Psychiatric Society. The number of women doctors joining psychiatry has started increasing only recently as suggested by higher percentage of members with less than five years.
Women have formed about 20% of the candidates joining psychiatry residency in the last five years at the All India Institute of Medical Sciences, New Delhi. Most of the premier medical schools of the country have women faculty; a few of them are professors. Few women have also been known to have headed a psychiatric hospital or a medical college.
Contributions in Indian Psychiatric Society
Currently, there is no female office bearer in the Indian Psychiatric Society however, since its inception in 1947, women psychiatrists have held the post of president four times: Prof. Ajita Chakraborty in 1976, Prof. Roshan Master in 1981, Prof. Jaya Nagaraja in 1983 and Prof. Deepali Dutta in 1990. Prof. Ajita Chakraborty has also held the post of general secretary of the society in 1967 and 1968.
Contributions in Indian Journal of Psychiatry
Among 170 papers, which had women as first authors, there were only 45 papers published prior to 1980. Dr. Miss Mani B Ghamat was the first woman psychiatrist to publish an article in the earlier version of the journal, Indian Journal of Neurology and Psychiatry in 1952. She worked as assistant psychiatrist at JJ Hospitals, Bombay. She was also probably the first women psychiatrist recorded to be a member of the society. Prof. Ajita Chakarborty, Prof. Roshan Master, Prof. Erna Hoch, Prof. M. Sarada Menon, Prof. Deepali Dutta were some of the pioneer women researchers.
The numbers of women psychiatrists who have published in the journal also have started increasing from 1980 onwards. The areas where women psychiatrists have established themselves as leaders are child psychiatry, schizophrenia, disability, suicide and mental health issues related to women.
Other issues with Female Psychiatrist
On discontinuation of a job for family building or other reasons, options for revival of career after a certain period are presently unavailable due to restrictions in age of entry and qualification for jobs at different levels. Currently there are no regulations or policies from government which can address these issues. There is little opportunity for flexible training, creative scheduling of job or training if a woman wants to come back to academics after a gap due to child care responsibility.
Although the country is credited for having the first woman Prime Minister in the region, currently there are very few women psychiatrists in top positions of the Indian Psychiatric Society or other national bodies despite their increasing numbers. Therefore, at present, the role of women psychiatrists in policy making of the specialty remains negligible. The gender inequity has been explained by the fact that women, because of family obligations, work fewer hours, are less productive, and have limited publications. The reason may be women have often fewer mentors, professional networks and less collegial support in the academic medical system.
In Summary
The number of women psychiatrists in India is on rise in the recent years. Indian women psychiatrists have many contributions to their credit. They have left their marks on various areas of psychiatry; significant among them are child psychiatry, suicide and its prevention, community psychiatry, rehabilitation of patients with schizophrenia and issues related to women mental health. But to succeed and flourish, they need support both at home, workplace and colleagues. All of us have to innovate in finding ways to maximize the optimal use of the substantial talent pool and intellectual capital of female psychiatrists.

Dr Sampada Anvekar
MD (Psychiatry KEM Mumbai)
Assistant Professor, Dept of Psychiatry, VMGMC and CIVIL Hospital, Solapur